Sunday, June 24, 2007

हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिण्याचे खरे तर जीवावर आले होते. मात्र ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत हा लेख वाचला आणि लिहिण्याची उर्मी आवरली नाही. सध्या शिवाजीचे दिवस आहेत. त्यामुळे रजनीकांतवर सर्वच जण लिहित आहेत. संजय राऊत यांनी रजनीकांत बद्दल छान लिहिले आहे. त्यातील काही माहिती तर मलाही नवीन होती. केवळ राजबहादूर यांच्याबरोबरच नव्हे; तर बंगळूरमधील सर्वच जुन्या मित्रांशी रजनीकांत यांनी मैत्री जपली आहे. त्यांच्या या नम्रपणामुळेच लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
एकच गोष्ट! ही चूक लोकसत्तातील एका लेखातही झाली होती आणि श्री. राऊत यांच्या लेखातही झाली आहे. ‘शिवाजी’ चित्रपटात रजनीकांत ‘मी महाराष्ट्राचा हिरो’ आहे, असे कधीही म्हणत नाही. तो म्हणतो, ’नान पराशक्ती हिरो.’ (मी पराशक्तीचा हिरो आहे.) पराशक्ती हा शिवाजी गणेशन यांचा तमिळमधील ‘माईलस्टोन’ चित्रपट आहे. त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही.
दुसरे म्हणजे रजनीकांत यांच्या यशात त्याच्या मराठी असण्याचा काही संबंध नाही. आपण मराठी असल्याचे त्यांनी कधी लपविलेही नाही आणि मराठी असल्याची वृथा फुशारकीही मारलेली नाही, हे त्यांचे मोठेपण! रजनीकांत महाराष्ट्रात राहिले असते, तर त्यांना आजचे वैभव पहायला मिळाले असते का, हा खरा प्रश्न आहे.
बाकी मराठीत रजनीकांत यांच्याबद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक आहे. तो लेख येथे वाचता येईल.
http://saamana.com/2007/June/24/Link/Utsav_1.htm

No comments:

Post a Comment